माझी वसुंधरा अभियान या उपक्रमामध्ये सहा उपक्रमांद्वारे निसर्गाच्या पाच घटकांना पुनर्स्थापित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि वयोगटातील भागधारकांना सामावून घेऊन त्यांना शाश्वत विकास आणि वातावरणीय बदल यांविषयी जागृत करणे, हे महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या या उपक्रमाचे लक्ष्य आहे.
माझी वसुंधरा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने संभाव्य कृती बिंदू ओळखण्यावर लक्ष केंद्रित करते. यामध्ये प्रत्येक नागरिकाला वैयक्तिक पातळीवर जोडण्याचे उद्दीष्ट आहे. सरकारी संस्था (माझी वसुंधरा शिखर परिषद), स्थानिक आणि जागतिक कॉर्पोरेट्स (माझी वसुंधरा कॉर्पोरेट्स) आणि सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ना नफा संस्थांना (माझी वसुंधरा नॉन प्रॉफिट) एका छताखाली आणून परिवर्तनाचे नेतृत्व करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. एवढेच नव्हे तर माझी वसुंधरा अभियानाने भावी पिढ्यांमध्ये हरित मूल्ये रुजविण्यासाठी पुढाकार घेतला आहे आणि महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासक्रम विकसित करण्याची योजना आखली आहे.